सोशल मेडिया आणि स्मार्ट फोन ह्यांमुळे माहितीच्या प्रसारात खूप वाढ झाली आहे. आज कुठलीही माहिती अगदी सहज आणि अगदी वेगात उपलब्घ होऊ शकते तसेच माहिती अनेक लोकांपर्यंत सहज पसरू शकते . ह्या उत्क्रांती मुळे जग छोटे झाले आहे . पण ह्याच्या फायद्या सोबतच काही तोटेही झाले आहेत . ज्ञान व माहिती च्या प्रसारा सोबतच अफवांचा प्रसार अगदी वेगात होतो आहे . ह्या अफवा सामाजिक, आर्थिक व आरोग्यविषयक समस्या निर्माण करतात . सोशल मेडियाचा वापर करताना ह्या गोष्टींचे भान ठेवणे फार आवश्यक आहे . आज आपण सोशल मेडिया व त्यातून निर्माण होणारे गैरसमज ह्याच्याविषयी थोडी चर्चा करूया .
