Scroll to top

आरोग्यदायी दिवाळी! आनंदी दिवाळी!


vinayakhingane - October 26, 2016 - 2 comments

fb_img_1457626297506

आपली दिवाळी आरोग्यदायी व आनंदाची जावो. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! या वर्षी माझ्या पेशन्ट साठी दिवाळीनिमित्त काही वैद्यकीय सल्ले .

1. दिवाळीत तुमचे नेहमीचे डॉक्टर सुट्टीवर जाण्याची शक्यता असते. पर्यायी डॉक्टरांना भेटण्याची गरज पडल्यास पेशन्टची सगळी वैद्यकीय कागदपत्रं, रिपोर्ट आणि औषधं सोबत घेऊन जा. नवीन डॉक्टरांना पेशन्टची जास्तीत जास्त माहिती मिळणं आवश्यक आहे. काही ऍलर्जी असल्यास नवीन डॉक्टरांना आवर्जून सांगा.

2. दिवाळी आणि सुट्या ह्यामुळे तुचमे महत्वाचे वैद्यकीय निर्णय पुढे ढकलू नका. काही तपासण्या, डॉक्टरांच्या भेटी तसंच काही उपचार हे लवकर केल्याने फायदा होतो. त्यांच्यासाठी थोडा वेळ खर्ची पडला तरी त्यामुळे बराच त्रास वाचू शकतो. सणाच्या नावाखाली आरोग्याकडे दुर्लक्ष झाले असे व्हायला नको.

3. सुट्टीत गावी जाताना तुमची औषधं, तसंच औषधाच्या चिठ्या(प्रिस्क्रिप्शन) सोबत घेऊन जा. नेहमीची औषधं घ्यायची राहून गेल्यामुळे कधीकधी गंभीर त्रास होऊ शकतो. उदा: मधुमेहाची औषधं न घेतल्यामुळे एका दिवसातही रक्तातील  साखर अनियंत्रित होऊ शकते. बाहेरगावी तुमची नेहमीची औषधं मिळण्यास त्रास होऊ शकतो. अशा वेळी औषधं आणि प्रिस्क्रिप्शन सोबत असणं उपयोगी पडते. पर्यायी औषधं घेणं सुद्धा यामुळे सोपं होतं.

4.डायबेटिसच्या पेशंटना ह्या काळात आहाराविषयी जास्त जागरूक राहण्याची गरज असते. गोड पदार्थांशिवाय इतर पदार्थही जास्त कॅलरी असलेले असू शकतात. हे पदार्थ टाळावे. वजन वाढणे आणि डायबेटिस अनियंत्रित होणे हे वाईट. आपण आपल्या आजूबाच्या मधुमेही रुग्णांना खाण्यासाठीआग्रह करू नये. त्यांची पथ्ये पाळण्यासाठी मदत करावी. सणाच्या काळातही मधुमेहींनी आहाराची पथ्ये आणि व्यायाम नेहमीसारखाच ठेवावा. मधुमेहाशिवाय लठ्ठपणा, हृदयविकार इत्यादी आजारांमध्ये आहाराची पथ्ये पाळणाऱ्यांसाठी हा परीक्षेचा काळ असतो.

5. दम्याच्या बऱ्याचशा पेशन्टना ह्या काळात त्रास होतो. वातावरणातला बदल तसेच फटाक्यांमुळे होणारा धूर ह्याने दम्याची उबळ येऊ शकते. धुरापासून दूर राहून प्रतिबंध होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे दम्याची औषधे सुरु करून दमा नियंत्रणात आणल्यास उबळ येण्याची शक्यता/भरती करावं लागण्याची शक्यता कमी होते.

6.फटाक्यांनी होणाऱ्या दुर्घटना टाळता येण्यासारख्या असतात. लहान मुलांनी फटाके उडवताना मोठ्यांनी सोबत असणे आवश्यक आहे. अशा वेळी मोठ्यांनी पूर्ण लक्ष (मोबाईल मध्ये लक्ष न ठेवता) मुलांकडे ठेवावे. अशा वेळी फटाके काळजीपूर्वक कसे उडवायचे व काय करू नये हे मुलांना सांगावे. फटाक्यांमुळे होणाऱ्या अपघाताने मुलांच्या पुढील आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. रुग्ण , जेष्ठ नागरिक व लहान मुले ह्यांना मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे खूप त्रास होतो. त्यांना त्रास होऊ नये ही आपली जबाबदारी आहे हे मुलांना समजावणे व ह्या जाबाबदारीत त्यांना सहभागी करणे ह्याची आपल्याला एक संधी ह्यावेळी मिळते. सुरक्षित पद्धतीने आगपेटी व दिवे कसे वापरायचे हे लहान मुलांना व्यवस्थित शिकवणे सुद्धा आवश्यक आहे.

डॉ विनायक हिंगणे

डॉ रेणुका हिंगणे

Contact Us
close slider

    Discover more from Vinayak Hingane

    Subscribe now to keep reading and get access to the full archive.

    Continue reading

    ×

    Hello!

    Click one of our representatives below to chat on WhatsApp or send us an email to vinayakhingane@gmail.com

    ×